Reflections for the Homily of 15th Sunday in Ordinary Time (12-07-2026) By Fr. Cedrick Dapki
सामान्य काळातील पंधरावा रविवार
दिनांक: १२/०७/२०२६
पहिले
वाचन: यशया ५५:१०-११
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३
शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३
आज आपण सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहोत. आणि आजची उपासना आपणास
प्रभूच्या शब्दावर मनन – चिंतन करून त्या शब्दाद्वारे फलदायी जीवन जगण्यास बोलातीव
आहे.
पहिल्या वाचनात, यशया संदेष्टा बॅबिलोनमधील यहुदी गुलाम बांधवांना धीर देतो आणि त्यांना खात्री
देतो की, ज्याप्रमाणे पाऊस आणि बर्फ जमिनीला पाणी देऊन बियांना अंकुरित व विकसित
होण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे देवाचे वचन त्याचा उद्देश पूर्ण करेल.
दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला आठवण करून देतात की, ज्याप्रमाणे भरपूर पीक येण्यासाठी बियांना जमिनीत पडून नष्ट व्हावे लागते, त्याचप्रमाणे
मानवाला फलदायी होण्यासाठी स्वतःला विसरून प्रभूमध्ये प्रभूमध्ये जीवन जगावे
लागेल.
आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त बी पेरणाऱ्याच्या दाखल्याद्वारे सांगू इच्छितो कि
जो मनुष्य प्रभूचा शब्द जितका संपूर्ण मानाने व हृदयाने स्वीकारतो व जगतो तो
मनुष्य शंभर पटीने फलदायी बनतो.
प्रभूचे शब्द आपल्या जीवनात आत्मसात करून त्या प्रमाणे जीवन जगण्यास आपणास कृपा व सद्बुद्धी मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
चीन मधील
बांबूची गोष्ट तर ऐकली असेलच! मोसो (Moso) हा चीन एक
मधील बांबूचा प्रकार आहे. हा बांबू थंड हवामानात वाढणाऱ्या बांबूंमध्ये सर्वात
मोठा आहे, जो पंच्याहत्तर फूट उंच आणि आठ इंच
व्यासापर्यंत वाढतो. हा बांबू लावल्यानंतर ५०-६०
दिवसांपर्यंत जमिनीतून वर आल्याचे कोणतीही चिन्ह दाखवत नाही. परंतु अचानक
ते ४० दिवसानंतर जणूकाही जादूने ७५ फूट उंचीपर्यंत वाढू लागतो. बांबूची जलद वाढ ही
त्या दोन महिन्यांत तयार होणाऱ्या मैलोनमैल मुळांमुळे होते. त्या बांबूची मुळे
पहिला खोलवर रुतली गेली, ती मजबूत झाली आणि अश्या ह्या त्याच्या
साखोळ परिश्रमामुळे आकाशात उंच वाढले व मजबूत होऊन टिकाऊ बनले. अशाप्रकारे आजची
उपासना आपणास प्रभूच्या जीवनात खोलवर रुतून फलदायी होण्यास बोलावत आहे. ज्याचे
जीवन प्रभूच्या वचनांवर अवलंबून असते तो कशीच अपयश अनुभवत नाही, या उलट तो
प्रभूमध्ये भरभराटीचे जीवन अनुभवत असतो असा संदेश आपणास मिळत आहे.
बी
पेरणाऱ्याचा दाखला लक्षात घेतला असता, आजच्या
आधुनिक जगात शेतकरी शेती करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतो, , उच्च
दर्जाचे बियाणे वापरतो, रासायनिक खाते वापरतो व त्याच्याच
साहाय्याने तो शेतात भरघोस पीक घेतो. वाळवंट किंवा डोंगराळ भागात जेथें शेती होऊ
शकत नाही तेथें देखील शेतीची मशागत होत आहे.
हा मानवाने आधुनिक जगात आधुनिक तंत्राद्वारे केलेला चमत्कार आहे. परंतु
ख्रिस्ताच्या काळी असे न्हवते. भौगोलिक स्थिती लक्षात घेतली असता त्याकाळी लोकांची
शेतजमीन कमी होती. कदाचित बियाणे जास्तकाळ टिकून ठेवण्याची कला अवगत नसेल म्हणून
एक – एक बियाणे शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे होते आणि अशामुळे ते पेरणीच्या वेळी
काटकसरीने एक-एक बियाणे सांभाळून पेरत असतील आणि त्याच्या नंतरही पुरेसा पाणी, अनुकूल
हवामान नसल्याने पिक चांगले येईल याची शाश्वती न्हवती. म्हणून येशुख्रिस्त शेती
कशी करावी किंवा शेतात पिक कसे जास्त
आणावे ह्यावर भोध करीत नाही, तर शेतकऱ्याचे जीवन समोर ठेऊन आपले
आध्यात्मिक जीवन देवावर अवलंबून ठेऊन कसे जगावे हे स्पष्ट करून देतो.
ख्रिस्त हा
देवाचा शब्द बी प्रमाणे संपूर्ण जगात पसरवतो, आणि शब्द हा
मोजून-मापून पसरवित नाही, ठराविक किंवा निवडक लोकांना देत नाही, तर हा शब्द
उदारतेने संपूर्ण जगात पसरवित आहे, प्रत्येकाला
देत आहे. आणि हा शब्द जो – तो ज्याच्या
-त्याच्या क्षमतेप्रमाणे स्वीकारतो व प्रतिसाद देतो. हा शब्द जो पूर्णपणे
स्वीकारीत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही किंवा त्यांच्याने प्रभूचे कार्य
होत नाही. परंतु जो कोणी हा प्रभूचा शब्द संपूर्ण हृदयाने, मानाने व
आत्म्याने स्वीकारतो तो फलद्रूप होतो. कोणी तीसपट, कोणी साठपट
तर कोणी शंभरपट.
काही
दिवसापासून आपण पावसाची वाट पाहत होतो. जून महिना उलटला तरीही पावसाने काही
चिंन्हे दाखवली नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी
प्रार्थना ठेवल्या. सृष्टी जणूकाही जीवनहीन झाली होती; रिकामी
पडलेली शेत जमीन,
सुखे डोंगर
आणि कोरडी नदी, अशा ह्या देखाव्यात नैसर्गिक जीवन स्तब्ध
झाले होते. सगळं झोपल्यासारखं किंवा मेलेल्यासारखं वाटत होतं. अचानक जुलै महिन्यात पावसाळा सुरवात झाली सर्व
ठिकाणी पाणी; शेतात पिक यायला सुरुवात झाली, डोंगर
हिरवेगार दिसू लागले व नद्या वाहू लागल्या, अशा प्रकारे
सृष्टीने जणूकाही नव्याने सुरुवात केली. आणि हे सर्व शक्य झाले ते म्हणजे
पावसामुळेच. म्हणून हा पाऊस विनाकारण आला नाही तर त्याने येऊन आपला उद्देश पूर्ण
केला. ह्या उदाहरणाला आधारित आपण पहिल्या
वाचनात पाहतो कि यशया संदेष्ट्याद्वारे, परमेश्वर म्हणतो कि माझे शब्द हे
पाण्याप्रमाणे जीवन देणारे आहेत. पाणी जसा
संपूर्ण सृष्टीला जीवन देतो व सृष्टी फलदायी बनवतो तसेच माझे शब्द हे जिवंत शब्द
आहेत. त्या पवित्र शब्दाद्वारे मनुष्य विश्वासात व कृपेत वाढतो. तो पवित्र दैवी
शब्द ऐकणाऱ्याला सर्वकालिक जीवन देतो, अशी व्यक्ती
उत्सुकतेने प्रभूचे कार्य करते आणि
प्रभूच्या वाचनामुळेच फलदायी बनते.
परमेश्वराने मानवास शब्द दिला, पावसाप्रमाणे तो शब्द स्वर्गातून उतरला, तो शब्द देह झाला, मानव बनून जीवन जगाला व पाण्या प्रमाणे तो शब्द संपूर्ण जगभर पसरला. पित्याचा उद्देश असा होत कि मानवजातीने या शब्दाचा पूर्णपणे स्वीकार करावा व त्या शब्दाद्वारे त्यांचे तारण व्हावे. प्रभूचे राज्य हे सुपीक फळ देणारे आहे, भरभराटीचे आहे आणि सर्वकालिक आहे. म्हणून येशुख्रिस्त आपणास प्रभूचा शब्द हा पूर्णपणे स्विकारून फलद्रूप होण्यासाठी आव्हान करीत आहे. तीसपट, साठपट व शंभरपट असे पिक देण्यास बोलावीत आहे. म्हणून जगातील ऐहिक गोष्टी बाजूला सारून प्रभूच्या कार्यात विलीन होण्यास तयार असूया व फलद्रूप होण्याचा प्रयत्न करूया. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेचे सेवक परमगुरू, महागुरू व धर्मगुरू ज्यांनी प्रभूचे
कार्य हाती घेतले आहे त्यांच्या कठीण परिस्थितीत प्रभुने त्यांना राखावे, त्याचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात
पसरवण्यास सहाय्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या
श्रमाला फळ यावे, त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांना
शेतात काम करता यावे व नैसर्गिक आपत्ती टाळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. प्रभूचा शब्द प्रत्येकाच्या कानी पडावा, तो शब्द आत्मसात करून प्रभूमध्ये पवित्र
जीवन जगण्यास सहाय्य व्हावे तसेच स्वतःचे जीवन फलदायी बनवून इतरांचे जीवन उज्वलीत
करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जगात होणारी युद्धे थांबावीत, प्रभूचा शांतीचा शब्द सर्वत्र पसरून
अश्या ठिकाणी शांतीचे वातावरण निर्माण व्हावे व सर्वांना सलोख्याने व प्रेमाने
राहता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे आजारी आहेत, दुखात आहेत व अडचणीत आहेत; अशांना प्रभूचे सांत्वन मिळावे, त्यांच्या वाटेत आलेली सर्व पिडा दूर
व्हावी व त्यांना चांगल्या आरोग्याचा व जीवनाचा अनुभव घेता यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना
करूया. (प्रतिसाद)