Reflections for the Homily
of 22th Sunday in Ordinary Time (30-08-2026) By Br.
Criston Marvi
सामान्य काळातील बाविसावा रविवार
प्रस्तावना:
प्रिय भाविकांनो आज आपण
सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहोत.
आजची उपासना ही आपल्याला
देवाच्या योजनेला समर्पण करून फलदायी होण्यास आमंत्रण करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया प्रवक्ता सांगतो की, परमेश्वर तू माझ्यापेक्षा प्रबळ आहेस त्यामुळे तो विजयी
झालास. यिर्मया संदेष्टा हा देवाचा शब्द पसरविण्यासाठी
कोणत्याही दुःखाला सामोरे जाण्यास तयार होता. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या
नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कारण देवाची करुणा ही अपार
आहे. आपले संपूर्ण जीवन देवाच्या सेवेसाठी अर्पण करा. तसेच शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशूचे दुःखसहन, मरण व पुनरुथानाचा मार्गात
पेत्र अडथला आणतो. परंतु येशू ह्या अडथळ्या पलीकडे जाऊन आपणा प्रत्येकांना
बोलावत आहे.
येशूच्या मागे जाण्यासाठी
सर्वप्रथम आपण स्वतःला विसरून त्याग केला पाहिजे. परमेश्वराचा मार्ग हा त्यागाचा व
प्रेमाचा आहे. ज्याच्यामध्ये आपण स्वतःच्या जीवाला येशूच्या हाती सोपवून त्याचा पाठलाग करण्यास
कृपा व शक्ती मागूया.
मनन चिंतन:
बोधकथा: बागेतील एक लहान रोप
एकदा एका सुंदर बागेत आंब्याचे एक छोटेसे रोप वाढू लागले. ते
रोप खूप आनंदी आणि उत्साही होते. आपले आयुष्य कसे जगायचे, याबद्दल त्याने स्वतःच अनेक योजना केल्या
होत्या. उदाहरणार्थ, कोणत्या दिशेने फांद्या वाढवायच्या आणि लवकरात लवकर
फळे कशी आणायची, याचा तो विचार करत असे.
बागेचा माळी जेव्हा त्या रोपाची छाटणी करायला यायचा आणि त्याला
योग्य दिशेने वाढण्यासाठी आधार द्यायचा, तेव्हा रोपाला वाईट वाटायचे. त्याला वाटायचे, “माझ्या
इच्छेप्रमाणे वाढण्यात हा माळी अडथळा आणत आहे.” म्हणून रोपाने आपल्या मनाप्रमाणे
काही फांद्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे त्या
फांद्या सुकून गेल्या. रोपाला खूप त्रास झाला आणि ते थकून गेले.
शेवटी एक दिवस रोपाने माळीला मनापासून प्रार्थना केली, “हे माळी, माझ्या
स्वतःच्या विचारांनी आणि प्रयत्नांनी मी खूप थकलो आहे. आता मला जसे घडवायचे आहे
तसे घडव. मी माझ्या सर्व इच्छा सोडतो आणि स्वतःला तुझ्या हातात सोपवतो.” त्यानंतर
रोपाने स्वतःच्या मनाप्रमाणे वाढण्याचा हट्ट सोडून दिला. माळी जे काही करत असे,
ते ते शांतपणे स्वीकारू लागले. माळीने प्रेमाने त्याची छाटणी केली,
त्याला पाणी दिले आणि योग्य आधार दिला. काही काळानंतर त्या रोपावर
सुंदर, पिवळे आणि गोड आंबे लागले. ते आंबे खूप रसाळ आणि
स्वादिष्ट होते. त्यांच्या सुगंधाने संपूर्ण बाग दरवळून गेली.
चिंतन
आजची उपासना ही
आपल्याला देवाच्या योजनेसाठीआपले जीवन अर्पण करून एकदायी बनण्यास आमंत्रण देत आहे.
पहिल्या वाचनामध्ये यिर्मया प्रवक्ता
अनेक दुःखांना व संकटाना सामोरे जावून देवाच्या योजनांना स्वःताचे जीवन समर्पण
करतो. आणि दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे कि, आपले शरीर हे देवाला जिवंत यज्ञ म्हणून अर्पण करा. जेव्हा आपण
स्वःताला देवासमोर सामोरे जातो तेव्हा ती अशक्ती नसून एक शक्तीचे चिन्ह आहे.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताने सांगितले की, तू खडक आहेस आणि ह्या खडकावर माझी मंडळी उभारीन आणि आज त्याच व्यक्तीला
येशू ख्रिस्त सांगत आहे की सैताना माझ्यापुढून मागे जा. कारण सैतान येशूला
घुरळ घालून वधस्तंभाचा मार्ग थांबवून जागतिक आनंद व सत्तेचा मार्ग दाखवत होता.
पेत्र हा येशूच्या जवळचा प्रेषित असून येशूचे कार्य ओळखण्यास कमी पडला. तो परमेश्वर पित्याने येशूसाठी जो मार्ग रचला होता, त्या मार्गाला अडथळा आणत होता. ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल उचलणे म्हणजे सर्वप्रथम स्वतःचा त्याग करणे. स्वतःचा त्याग करून आपल्या जीवनात देवासाठी किंवा यशासाठी जागा तयार करणे. परमेश्वराची सुवार्ता पसरविताना शांत बसून अडचणी पासून पळून जाण्यात यश नाही, तर प्रार्थनेत वेळ घालून देवाची योजना काय आहे हे ओळखण्यात आहे. कारण येशू ख्रिस्त हा आपला मार्ग आहे. परमेश्वराचा मार्ग हा त्यागाचा आणि प्रेमाचा आहे. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या मरणावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला दिसून येते कि, येशू ख्रिस्ताचे मरण हे पराजय नसून तर पास्काचा आनंद आणि विजय आहे. त्याचे दुःख आणि मरण हे तारण प्राप्त करून देणारे होते. ह्या विजयाची जाणीव ही येशू ख्रिस्ताला ठाऊक होती, म्हणून आजच्या शुभवर्तमानात, येशू ख्रिस्त हा त्याच्या स्वतःच्या दुःख, मरण आणि पुनरुस्थानाविषयी सांगत आहे.
येशू ख्रिस्तामध्ये वाढणे म्हणजे स्वतःच्या मर्यादाच्या पलीकडे जाणे व त्याच्या सानिध्यात राहून स्वतःला त्याच्या कार्यासाठी अर्पण करणे. आपल्या प्रत्येकाचे मिशन कार्य फक्त एकच असेल पाहिजे आणि ते म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये राहणे. आपण जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये राहतो तेव्हा आपण त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असतो. म्हणून दुःखाच्या संकटांना अलिंगन मारणे म्हणजे स्वतःला तारणाच्या शक्तीला स्वीकारण्यास मोकळं करणे.आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक निर्णयात येशू आपल्याकडून काय अपेक्षा करतो, हे नेहमी पवित्र आत्म्याला विचारायला हवे, जेणेकरून आपणास मिळालेल्या मिशनकार्यात त्या गोष्टीचे स्थान आपल्याला ओळखता येईल.
आजच्या
जगात येशू ख्रिस्ताचे प्रतिबिंब उमटवू शकेल असे आपले ‘वैयक्तिक रहस्य’ आपल्यामध्ये घडवून
आणण्याची संधी पवित्र आत्म्याकडे सोपवू या. प्रभूचा संदेश जो ख्रिस्त आपल्या
जीवनाद्वारे जगाला सांगू इच्छितो याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आपण स्वतःमध्ये
परिवर्तन घडून आले पाहिजे. त्या करीता आत्म्याद्वारे स्वतःचे नूतनीकरण झाले
पाहिजे, जेणेकरून हे साध्य करता येईल. आमच्या चुका आणि चुकांची पावले असूनही प्रभू
हे आपले मिशनकार्य पूर्णत्वास नेईल; अट एवढीच की, प्रत्येकाने प्रेमाचा मार्ग सोडू
नये आणि त्याच्या त्या अलौकिक कृपेसाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे, जी कृपा अंतःकरणाला शुद्ध करते आणि
प्रकाशित करते. येशू ख्रिस्ताशी आणि त्याच्या इच्छेशी एकरूप होणे म्हणजे प्रेम, न्याय
आणि शांती एकता होणे, व त्याग, तसेच
त्यातून मिळणारा आनंद व समृद्धी या सर्वांचा अनुभव ख्रिस्त स्वतः आपल्यासोबत घेऊ
इच्छितो. या प्रयत्नांत आपले सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तन-मनाने समर्पित
झाल्याशिवाय आम्ही पवित्रतेच्या मार्गावर प्रगती करू शकत नाही. देवाला अपेक्षित
असल्याप्रमाणे निर्दोष राहण्यासाठी, आपण देवाच्या गौरवाने वेढलेले राहून त्याच्या
सान्निध्यात नम्रपणे जगले पाहिजे; तसेच, आपल्या जीवनातील देवाचे निरंतर प्रेम
ओळखून त्याच्याशी एकरूप होऊन चालले पाहिजे. ज्या सान्निध्यामुळे केवळ आपले भलेच
होणार आहे, त्याबद्दलची भीती आपण सोडून दिली पाहिजे. एकदा का आपण देवाला स्वीकारले
आणि देवाविना जगण्याचा प्रयत्न थांबवला, की एकाकीपणाची वेदना नाहीशी होईल. अशा
प्रकारे, आपण प्रभूची सुखद आणि परिपूर्ण इच्छा जाणून घेऊ शकू आणि कुंभाराप्रमाणे
तो आपल्याला घडवू शकेल, यासाठी आपण त्याला वाव देऊ.
आपण हे विसरू शकतो की, “जीवनाला कोणतेही
विशिष्ट ध्येय नसते, तर जीवन हेच स्वतः एक ध्येय असते.”
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: :
प्रभू, तुझी दया दृष्टी आम्हावर वळव.
१. आमचे पोप लिओ चौदावे तसेच देऊळ मातेचे
सर्व कार्यकर्ते व सर्व विश्वासू लोकांना तुझी सुवार्ता जगाच्या काना
कोपऱ्यात पसरविण्यासाठी चांगले आरोग्य
लाभावे व निसर्गाबरोबर एक चांगले नाते जोडता यावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. नेपाल मध्ये आलेल्या महापुरामुळे
हजार लोकांचे संसार वाहून गेले आहेत. प्रभू परमेश्वरा त्यांना मदतीचा हात पाठव.
त्यांना तू धीर दे. ठिकठिकाणी साचलेले पाणी लवकर ओसरू दे. आणि तुझ्या कृपेने
सर्वांचे जनजीवन पुन्हा नव्याने सुरू कर. म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. प्रत्येक नागरिकांनी निसर्गाचे
महत्त्व जाणून त्याची रक्षा करावी. व प्रत्येक जीव-जंतूमध्ये देवाची निर्मिती
पाहता यावी. म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे डॉक्टर्स आणि नर्सेस हॉस्पिटलमध्ये
सेवा करत आहेत. त्यांना चांगले आरोग्य व त्यांच्या कार्याला नेहमी यश लाभावे. व जे
साहित्य व औषधे उपचारासाठी वापरतात त्यांच्यावर प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा.
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे आत्मे देवा घरी गेलेले आहेत
विशेष करून नेपाळच्या पुरामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे. त्या सर्व व्यक्तीना
स्वर्गीय नंदनवन लाभावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.