Thursday 29 August 2019



Reflections for the homily for 22nd Sunday in Ordinary Time (01-09-2019) by Br. Julius Rodrigues. 


सामान्य काळातील बाविसावा रविवार



दिनांक: १ /०९ /२०१९
पहिले वाचन: बेनसिरा ३: १९२१, ३०३१
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८१९, २२२८
शुभवर्तमान: लूक १४ : १,१४.

प्रस्तावना:

आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्यास नम्र बनण्यास आमंत्रित करीत आहे.
बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि, परमेश्वर कितीही सामर्थ्यवान व महान असला तरीही तो नम्र लोकांचा पूज्यभाव स्वीकारतो व आपली रहस्ये विनयशील जनांस प्रकट करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इब्री लोकांस ऐहिक सिओन व स्वर्गींय सिओन ह्यामधील फरक स्पष्ट करून देत आहे. तर लुककृत शुभवर्तमानात ख्रिस्त नम्रता व आदरातिथ्याचा दाखला देऊन म्हणतो कि, ‘जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल’.
ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपण ख्रिस्ताकडे नम्रतेचे कृपादान मागूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: बेनसिरा ३: १९२१, ३०३१.

बेनसिरा ह्यांची बोधवचने हा ग्रंथ एक्लेझीयास्तसया नावाने देखील ओळखला जातात. ह्यामध्ये परमेश्वर आपला प्रेमळ पिता ह्या नात्याने तो त्याच्या मुलांना नम्रपणे वागण्याचा सल्ला देत आहे. कारण तो आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि म्हणून आपली जी काही प्रतिष्ठा, मानसन्मान व आदर आहे हे आपलं नसून परमेश्वराकडून मिळालेले दान आहे. म्हणूनच परमेश्वर सांगतो कि प्रतिष्ठीत व नामांकित पुष्कळ आहेत, परंतु तो आपली रहस्ये विनयशील जनांस प्रगट करितो.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८१९, २२२८

इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राचा लेखक हा यहुदी धर्मातून ख्रिस्ती झाला होता. जो ह्या वाचनात आपल्यासमोर दोन दृश्य ठेवत आहे. १) परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर सिओन पर्वतावर केलेला करार म्हणजेच ऐहिक सिओनकिंवा जुना करार. २) स्वर्गीय जेरुशलेम म्हणजेच नवीन करार किंवा स्वर्गीय सिओन’.
परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर केलेल्या जुन्या करारात इस्राएल लोकांत भय दडलेले होते. परंतु नवीन करारात परमेश्वराविषयी प्रेम समाविष्ट होते.


शुभवर्तमान: लूक १४ : १,१४.

शास्त्री व परुशांना भर बाजारात नमस्कार घेणे आवडत असे तसेच त्यांना प्रतिष्ठेने व मानाने दिलेल्या नमस्काराने ते भारावून जात. त्यांना सभागृहात मानाची आसने पटकावण्यासाठी आवडत असे. तसेच मेजवानीच्या प्रसंगी मुख्य बैठ्कांवर आरूढ होणे त्यांना आवडत असे. म्हणूनच ख्रिस्त आजच्या दाखल्यात सांगत आहे कि, कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिल्यास मुख्य आसनावर बसू नका तर अगदी शेवटच्या  जागेवर जाऊन बसा.
या अध्यायातील सर्व प्रसंग भोजनाशी निगडीत आहेत. त्याकाळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचे भोजनावळ हे एक व्यासपीठ होते. भोजनाच्या निमित्ताने येशूने आध्यात्मीक आणि सामाजिक जीवनासबंधी महत्वाचे भाष्य केले. येशूला उपेक्षितांबद्दल विशेष प्रेम होते. समाजात श्रीमंत आणि कंगाल याच्यांत भेदभाव केला जातो, हि गोष्ट त्याला आवडली नाही. त्याने नेहमी सामाजिक समतेचा आग्रह धरला म्हणूनच हा दाखला सांगत असताना ख्रिस्त आपणास बोध देतो कि, ‘जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल’. ख्रिस्त स्वतः देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. (फ़िलिप्पैकरांस पत्र २: ६-८ ) ख्रिस्त आपणासाठी नम्रतेचा एक उत्तम आदर्श आहे. तो सांगतो कि, मी मनाचा सौम्य व लीन आहे. (मत्तय ११: २९ ) उपेक्षित, पिडीत, कंगाल, आंधळे पांगळे ह्यांना त्या वेळी सामाजिक जीवनात स्थान नव्हते. त्यांची जागा तळागाळात होती. परंतु ते येशूचे, लाडके होते. अनेकदा गरजूंना मानासिकदृष्ट्या पांगळे करण्यासाठी देणग्या दिल्या जातात, अन्नछत्रे उघडली जातात. दुर्बलांवर अधिकार गाजवण्याचे हे एक साधन बनते. परंतु, येशुने, त्यालाही विरोध केला. ‘गोरगरीबांना जेवणावळी दया’. असे येशूने सांगितले नाही, तर त्यांना आपल्याबरोबर एकाच मेजावर भोजन करण्यासाठी आमंत्रित कराअसा आग्रह त्याने धरला.

मनन चिंतन:

माणसाचा स्वभाव हा विचित्र आहे. जे आपण करायला नको तेच आपण करत असतो. जो आपल्याला आवडत नाही ते कुरुण आपण आपल्याच स्वभावाचे गुलाम होत असतो. आजच्या पहिल्या वाचनावर आणि शुभवर्तमानावर जर आपण नजर टाकली तर आपणास दिसून येते कि आपण कधी-कधी काही गोष्टी देखाव्या साठी करत असतो. दुसऱ्यांची आपल्यावर नजर असावी, दुसऱ्यांनी आपल्याला मान-सन्मान द्यावा, आपली स्तुती- सुमने गावी दोघा-चौघात आपणास शाबासकी मिळावी ह्यासाठी आपली धड-पड चालू असते. ह्या मानवी देखाव्या स्वभावाला रामबाण  औषध हे आजच्या वाचनात आपणास ऐकावयास मिळते.
          पहिल्या वाचनात बेनसिरा आपणास होईल तेवडे नम्र व विनंम्र होण्यास आव्हान देत आहे. माणसाचा मोठेपणा पदवीत, किमतीत, देखण्यात किवा मालमत्तेत अवलंबून नसून माणूस जितका मोठा तितकाच त्याने आपल्याला नम्र, लहान, सौम्य केल्यास परमेश्वराच्या दृष्टीत तो महान होऊन त्याची कृपा दृष्टी त्या व्यक्तीवर पडत असते. पुढे आपल्याला सांगण्यात आले आहे कि देखावा, गर्विष्ट ह्यांना कोणत्या प्रकारच्या वेदना भोगाव्या लागणार आहे आणि ह्या स्वभावाला औषध तर नाहीच पण ते आपल्या सर्वनाश करत असतात.
शुभवार्मानात येशू दाखल्याच्या स्वरूपात आपल्याला महान संदेश देत आहे. तो आपल्याला सांगत आहे, की आपणास आमंत्रण मिळाले असेल तर आपण कसे वागावे. एखाद्या गर्विष्ट व नावलौकीकतेसाठी हापापला असेल तर पहिले आणि मुख्य आसन घेतो पण योग्यतेचा मनुष्य आल्यानंतर आपलाच अपमान करू घेतो.पण जो स्वत:ला नम्र लहान करून खालच्या जागी जावून बसतो तेव्हा चार-चौगात, जर ती व्यक्ती योग्यतेची असेल तर उंचावली जाईल.
पुढे येशू सांगत आहे कुठल्या प्रकारच्या लोकांना भोजनाला बोलवावे. जे आपला आदर सन्मान करतील आपल्याला त्यांच्या घरी बोलावून घेतील अश्यांना आमंत्रण देणे म्हणजे परत फेडीची अपेक्षा करणे. गोरगरीबांना दीन-दुबळ्याना, लुळ्या-पागल्यांना बोलावणे म्हणजे त्यांच्या सारखे लहान व नम्र होणे, ते नक्कीच परत फेड करू शकत नाही पण आपणाला आशीर्वादित करतात. ज्यांच्या अंगी नम्रपणा व  लहानपणा असतो तेच असे करू शकतात. गर्विष्टपणा आणि दिखाऊ वृत्तीची माणसे मान-सन्मानासाठी जगत असतात चार चैघामध्ये नाव कमावू पाहतात. म्हणून खरोखर जो स्वत:ला नामवितो तो उंच केला जातो आणि जो स्वताला उंच करतो तो नमविला जातो.

बोधकथा:

 संतान डिसोजा नावाची बाई ह्याचा पंच्याहातरावा वाढ दिवस होता, तिचा वाढदिवस आनंदात आणि मैंज-मजेत साजरा करण्यास तिची मुले-मुली व नातवंड-परतुंड उत्साहित होते आईचा वा आजीचा वाढदिवस कसा साजरा करायचा ह्यासाठी सभा बोलवण्यात आली.ह्या सभेमध्ये काही विषयावर चर्चा करण्यात आली. उदाहरनार्थ कोणाला आमंत्रित करायचे, कोणत्या प्रकारचे जेवण करायचे, आई-आजीचा मान-सन्मान कसा करायचा कि ज्याद्वारे सांतान बाईला आनंद होईल.
          चर्चेसाठी पहिला विषय होता तो म्हणजे सांतान बाईचा फोटो सुवार्ता व नीरोप्या मासिकात देऊन नामलौकीक्ता करायची. ह्यावर नातवंड-पोत्वंड ह्यांनी आक्षेप घेतला. देखाव्यासाठी, माणासाठी व नावासाठी आपण वाढदिवस साजरा ण करता ते पैसे गोर-गरिबासाठी, अनाथ आश्रमाला द्यावे अशी सूचना देण्यात आली.
          पुढे आमंत्रण कोणाला द्यायचे ह्या विषयावर चर्चा सुरु झाली. आपण अमुक नातेवाईकाला आमंत्रण अश्या अनेक सूचना आल्या. पण अमुक व्यक्तीला बोलावले तर दुसऱ्याला राग येईल. कोणाला आमंत्रित करावे व कोणाला सोडावे हे मात्र कळत नव्हते, बघता-बघता ९०० च्या वर नावे गेली होती. साध्या स्वरूपात वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला असता त्याचे रुपांतर मोठ्या सेलेब्रेशन मध्ये झाले. ह्या गोष्टीतून एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली कि जेवढे आपण साधे सेलेब्रेशन करू इच्छितो तेवढेच आवाक्या बाहेरच ते होत असते.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  ‘हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक’

१)    आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी यांना त्यांच्या प्रेषितीय कार्य करण्यासाठी तुझी कृपा दे त्याच प्रमाणे त्यांना नम्र हृद्य दे.
२)    आपल्या समाज्यात, कुटुंबात व धर्मग्रामात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
३)    समाजात वावरत असताना, आपण ख्रिस्ती म्हणून इतरापर्यंत नम्रतेची शिकवण आपल्या वागन्याद्वारे द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)    आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी असतील, त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा, त्यांना चांगले आरोग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.
५)    अति पावसामुळे कितेकांची  घरे उद्वस्त झाली आहेत, परमेश्वराने त्याच्या सांभाळ करावा आणि त्याच्या गरजा पुरवाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
६)      थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 






Thursday 22 August 2019




Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (25-08-2019) by Br. Robby Fernandes 







सामन्य काळातील एकविसावा रविवार





दिनांक- २५/०८/२०१९
पहिले वाचन- यशया: ६६: १८-२१
दुसरे वाचन- इब्री लोकांस पत्र: १२; ५-७,११-१३
शुभवर्तमान- लुक: १३:२२-३०

प्रस्तावाना-

          आज देऊळ माता सामन्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासन आपल्याला दोन विषयावर मनन चिंतन करावयास बोलावत आहे. एक म्हणजे- ‘रुंद मार्ग’ जो आपल्याला सैतानाकडे घेऊन जातो, तर दुसरा, ‘अरुंद मार्ग’ जो आपल्याला प्रभू येशू कडे घेऊन जातो, आता ह्या दोघामधील  कोणता मार्ग आपण निवडायचा, हे मात्र स्वतःवर अवलबून आहे. परंतु आज देऊळमाता ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा तारण प्राप्तीचा अरुद मार्ग अनुसरण्यास आपल्याला सांगत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर, यशया संदेष्टाद्वारे लोकांना सांगतो की, सर्व राष्ट्रांतील लोकांना एकत्र येऊन त्यांनी माझा महिमा व गौरव पाहावा, जेणेकरून त्यांना समजून येईल की, मी त्यांचा देव आहे. दुसरे वाचन हे इब्री लोकांस पत्र ह्यामधून घेतलेले असून ते आपल्याला  शिस्तीचे महत्त्व पटवून देते, ते तारणप्राप्तीसाठी किती महत्वाचे आहे हे सांगत आहे. तर शुभवर्तमानात  आपले तारण व्हावे म्हणून  अरुंद मार्ग निवडण्यास प्रभू येशू सांगत आहे.
          जर आपण परमेश्वराच्या मार्गावर न चालता इतर मार्गाचा उपयोग केला असेल तर परमेश्वरा चरणी क्षमा याचना मागुया व परमेश्वराच्या मार्गावर सदोदित चालण्यास कृपा सामर्थ्य मागुया.      

पहिले वाचन- यशया: ६६: १८-२१

          पहिले वाचन हे यशया संदेष्टांच्या पुस्तकातून घेतलेले आहे यशया सांगतो, की परमेश्वराला आपले विचार, कामे, आपली मने ठावूक आहेत. त्यामुळे तो आम्हांसर्वांना एकत्र करणार आहे; त्याची महिमा दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे इस्त्रायल लोक परमेश्वराला; पवित्र दाणे अर्पण करत त्याच प्रमाणे; परमेश्वर आपणाला शुद्ध करेल.

दुसरे वाचन- इब्री लोकांस पत्र: १२; ५-७,११-१३

          दुसऱ्या वाचनात परमेश्वर आपणाला शिस्तीचे उदाहरण देत आहे. शिस्त आपल्या जीवनाला नवा मार्ग देते. शिस्त आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे फार कठीण असते पण ह्या शिस्तीमुळे आपल्या जीवनामध्ये नवे वळण लागते व आपल्या जीवनाचा मार्ग नव्या दिशेने कार्यरत होतो व त्यामुळे आपण परमेश्वराचे अनुयायी व मुले बनतो; कारण तो आम्हांवर प्रेम करतो.

शुभवर्तमान-  लुक १३:२२-३०

          आजच्या शुभवर्तमानातील ख्रिस्त आपल्याला संदेश देतो की, तारण प्राप्तीसाठी फक्त अरुंद मार्गचा पर्याय सुचवतो आहे. लोकांनी येशूची शिकवण ऐकली परंतु त्या शिकवणी प्रमाणे वागले नाहीत त्यामुळे अनेक लोकांना तारण प्राप्त होण्यास कठोर होईल जे योग्य ठरले आहेत त्यांचीच देव राज्यामध्ये निवड झाली आहे, म्हणून येशू सांगतो, जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ने पाहिले होतील.

मनन चिंतन-

          आपले जीवन हे एक प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये चालताना अनेक प्रकारच्या लोकांची भेट होते. हा प्रवास दुसरा माणूस आपल्या साठी करू शकत नाही तो फक्त स्वत:लाच पूर्ण करायचा असतो, कारण आपल्या स्वत:लाच  माहित असते की आपले अंतिम मुक्कामाचे ठिकाण कुठे आहे, आणि जर आपण सभोवताली पाहिलं तर आपल्याला समजून येईल की जगातील प्रत्येक व्यक्ती प्रवास करत आहे, किंबहुना प्रत्येकाचा प्रवास करण्याचा मार्ग मात्र अलग असतो. या प्रवासाच्या मार्गावर चालताना व जीवनाचा आस्वाद घेताना खूप अडी-अडचणी आपल्या जीवनामध्ये समुद्राच्या लाटा प्रमाणे येतात व जीवनाच्या कुंपनावर मारा करतात परंतु ह्यामुळे आपल्या जिवनाचे ध्येय व लक्ष विचलित होते. अशा वेळी  आपण आपल्या ध्येया पासून भरकटतो. अशा ह्या परिस्थितीत आपली  देऊळ माता आपणा सर्वांना सांगत आहे की, आपला परमेश्वर प्रभू येशू हाच आपल्या आयुष्याचा मार्ग, सत्य व जीवन आहे.
          आज देऊळ माता आपणासमोर दोन प्रकारचे मार्ग ठेवत आहेत. एक म्हणजे, रुंद मार्ग जो आपणाला नरका मध्ये नेतो व दुसरा म्हणजे, अरुंद मार्ग, जो आपणा सर्वांना स्वर्गाकडे नेतो. आपण सर्वजण तारण प्राप्ती साठी धडपड करत असतो. पण तारणप्राप्ती आपल्याला साध्या व सोप्या मार्गावर होत नसते म्हणून येशू ख्रिस्त सांगतो की, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. जेणे करून तुम्ही सफल व्हाल. बायबल मध्ये आपल्याला दिसून येईल की स्वर्गाची तुलना खूप अशा प्रकारच्या वस्तूशी केलेली आहे. उदा. खमीर, मोहरीचा दाना, धन संपती, तसेच आजची वाचनेसुद्धा आपल्याला तश्याच प्रकारच्या मार्गाची जाणीव करून देतात. जेणे करून आपण जर त्या मार्गाने चाललो तर तारण प्राप्त होईल, आणि तो मार्ग म्हणजे अरुंद मार्ग.
रुंद मार्ग:
रुंद मार्ग हा आपल्याला पापा कडे घेऊन जातो आपल्याला साध्या व सोप्या पद्धतीने व कष्ट न करता सर्व काही मिळविण्याचा आश्वासन हा मार्ग देतो. त्यामुळे बहुतेक लोक ह्या सुखद मार्गाकडे जाण्यासाठी आकर्षित होतात. उदा. पैसा कमावण्यासाठी खूप प्रकारचे मार्ग आपल्या समोर उपलब्ध असतात. आपण कुठल्या मार्गाचा अवलंब करतो ह्यावर सर्वकाही स्थिर आहे. ह्या मार्गावर पुष्कळ लोक चालतात, कारण हा दुसऱ्या मार्गाहून जास्त रुंद व सरळ असतो, ह्या मार्गावर नियम नसतात, काहिहि अडथळे किव्हा कुंपण लावलेले नसते. आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो.
अरुंद मार्ग :
          अरुंद मार्ग हा आपणाला येशू कडे होऊन जातो अरुंद मार्गाद्वारे प्रवास करणे फार कठोर असते, म्हणून येशू म्हणतो, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. कारण आत जाण्याचा मार्ग हा अरुंद आहे, व ह्या मार्गावर दरवाजे सुद्धा अरुंद आहेत त्याच प्रमाणे हा मार्ग सुद्धा लहान, छोटा, लघु असा आहे, व ह्या मार्गावरील सर्व दरवाजे लहान व लघु आकाराचे आहेत. जर आपल्याला हा मार्ग घ्यायचा असेल तर हाल अपेष्टा सहन करायला सुद्धा तत्पर असायला पाहिजे. म्हणून ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आपल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही तर येशू ख्रिस्त ह्या अरुंद मार्गाविषयी, म्हणजे स्वत: विषयी आपल्याला ज्ञात करून देत आहे. कारण तो स्वत:हा अरुंद मार्ग आहे. जो कोणी ह्या मार्गावर चालेल त्यास तारण प्राप्त होईल.
          आपण सर्वजण आताच्या तंत्रज्ञानामध्ये एवढे गुरफटलो आहोत की, आपल्याला माहित नाही, कोठला मार्ग स्वीकारावा आपल्या समोर मृत्यू व जीवन हे दोन्ही ठेवले आहे, आपण फक्त काळजी पुर्वक्तेने मार्ग निवडायचा आहे. जेणे करून आपला देवाच्या राज्यात समावेश होईल.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक’

१)    हे प्रभू, खिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सीस, बिशप्स,धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. सर्व आपत्ती पासून त्याचे रक्षण कर व तुझा शब्द लोकांस देण्यासाठी तू त्यांना तुझ्या शांतीचे साधन बनव.
२)    हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा  अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हा सर्वांना तुझे सामर्थ व बळ लाभूदे जेणे करून आम्हांला तारण प्राप्ती होईल.
३)    आज आपण विशेष रित्या प्रार्थना करूया जे लोक पाण्याच्या पुरामुळे बे-घर झाले आहेत, संकटा मध्ये आहेत, अशा सर्व लोकांना परमे श्वरी कृपेचा अनुभव यावा व त्यांचे पुन्हा एकदा प्रभूच्या प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करूया.
४)    आपल्या धर्म ग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांना प्रभूच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नाविव जीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
५)    आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.
         

Friday 16 August 2019

Reflections for the homily of 20th Sunday in Ordinary time 
(18-08-2019) by: Br Jackson Nato




सामान्य काळातील विसावा रविवार


दिनांक : १८/०८/२०१९
पहिले वाचन: यिर्मया ३८: ४-६,८-१०
दुसरे वाचन: हिब्री लोकांस पत्र : १२:१-४
शुभवर्तमान:  लुक १२:४९-५३
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी  माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजची उपासना येशू ख्रिस्त परमेश्वराचे राज्य पसरविण्यासाठी आला ह्याबद्दल सांगत आहे. परमेश्वराचे राज्य हे प्रेमाचे आहे आणि ते जगाच्या कायद्यानुसार अवास्तव आहे. म्हणून हे पसरवित असताना प्रत्येकाला त्रासाला सामोरे जावे लागते.
आजच्या उपासनेवर जर आपण नजर फिरवली तर पहिल्या वाचनात आपणास पाहण्यास मिळते कि परमेश्वराचा शब्द प्रकट केल्यामुळे यिर्मयास  विहिरीत टाकण्यात आले. दुसऱ्या वाचनात लेखक आपल्याला ह्या जगातील त्रासासमोर धैर्याने  उभे राहण्यास सांगत आहे जेणेकरून आपण स्वर्गीय मुकुट आपणास प्राप्त होईल. तसेच आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या कार्या बद्दल उल्लेख करत आहे आणि ते पुढे नेण्यास  त्यांचे अनुयायी म्हणून आपली मनोरचना कशी असावी ह्याबद्दल उपदेश करत आहे.
ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जगत असताना आपण ख्रिस्त प्रेमाने भरावे व तेच प्रेम संपूर्ण जगाला देण्यास व येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबालीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यिर्मया ३८: ४-६,८-१०
          आजच्या पहिल्या वाचनात आपण यिर्मया संदेष्टाला, सुबुद्धीणे केलेल्या मार्गदर्शनाविषयी झालेल्या शिक्षेविषयी ऐकतो. कारण यिर्मया संदेष्टा आतापर्यंत होऊ गेलेल्या राज्यांनी कशा प्रकारे स्वखुशीसाठी व स्वार्थासाठी दुसऱ्या देशाबरोबर चुकीचे करार केले होते व त्याचा परिणाम म्हणजे यहुदी लोक परमेश्वरापासून दूर गेले होते ह्याबद्दल राजाला व लोकांना संदेश देत होता. ह्या काळात बॅबीलोन हे सर्वाधिक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयास आले आणि आजूबाजूच्या राष्ट्रांकडून कर वसुली करू लागले पण यहुद्यांच्या राजकुमारांनी त्यास विरोध केला व इजिप्तचे सहाय्य घेण्याचे ठरवले पण यिर्मायाने राजाला ते न करता बॅबीलोन देशास कर भरावा ह्याबद्दल मार्गदर्शन केले. जेणेकरून यहुदांची संपत्ती व मंदिरातील पवित्र मौल्यवान वस्तू तसेच यहुदाप्रांताची येणाऱ्या आपतीपासून सुटका होईल. परंतु यिर्मयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे होऊ नये म्हणून राजकुमांरानी राज्याचे कान भरले व यिर्मयास शिक्षेस पात्र ठरवले अशाप्रकारे यिर्मयाला कोरड्या  विहिरीत टाकण्यात आले जेणेकरून उपासमारीने तो मरणास बळी पडेल पण राजाचा सेवक अबिदमेलेय ह्याने राजाची कान उघडणी केली व यिर्मयास विहिरीतून बाहेर काढले. पण यिर्मया संदेष्टाचा सल्ला धूडकारून लावण्याचा परिणाम असा की यहुदा स्वतःचे स्वांतत्र्य हरवून बसला.
दुसरे वाचन: हिब्री लोकांस पत्र : १२:१-४
          आजचे दुसरे वाचन आपल्याला ख्रिस्ती पाचारणाशी एकनिष्ठ राहण्यास आमंत्रण करत आहे. आबेलपासून ख्रिस्तापर्यंत जेवढ़े पवित्र लोक होऊन गेले ते सर्व परमेश्वरची एकनिष्ठ राहिले. त्यांना झालेल्या त्रासाची व विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही म्हणून आपण ख्रिस्ती ह्या नात्याने त्यापेक्षा अधिक जोमाने देवाशी एकनिष्ठ राहिले. त्यांना झालेल्या त्रासाची व विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही म्हणून आपण ख्रिस्ती ह्या नात्याने त्यापेक्षा अधिक जोमाने देवाशी एकनिष्ठ राहिलो पाहिजे कारण आपल्यासमोर ख्रिस्त हे आपले परम उदाहरण आहे. म्हणून देवाशी एकनिष्ठ राहणे हि आपली एक शर्यत आहे ज्या अंती आपले प्रतिफळ आपल्याला मिळेल म्हणून हि शर्यत पार करताना येणारे सर्व अडथळे, ओझी म्हणजे पाप आपण टाकून दिले पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने पर्वा न करता क्रूसावरील मरण सोसले व परमेश्वराच्या उजव्या हाताशी आपले स्थान कायम केले त्याचप्रमाणे आपणसुद्धा होणाऱ्या त्रासाला न घाबरता, न कंटाळता स्वीकारले पाहिजे जेणे करून आपले प्रतिफल आपण प्राप्त करू.  
शुभवर्तमान:  लुक १२:४९-५३
आजच्या शुभ वर्त मानात थोडक्या शब्दात येशू आपले कार्य व त्यांस होणार असलेला विरोध स्पष्ट करतो येशू म्हणतो कि तो ह्या जगात शांती नव्हे तर फाटा फुट म्हणजे त्याचा संदेश स्वीकारणारे आणि न स्वीकारणारे ह्यामध्ये. येशू पुढे बाप्तीस्म्या विषयी बोलतो. तो बाप्तिस्मा म्हणजे संदेश पसरवितांना त्याला जो त्रास सहन करावा लागणार आहे तो पण तो सहन करण्यास तयार आहे. त्याचा संदेश घराघरां मध्ये फाटाफूट पाडेल ह्याचा अर्थ असा कि त्याच्यावर विश्वास ठेवणारे अर्थात ख्रिस्ती सुद्धां आपआपल्या मध्ये भांडून वेगळे होतील. अशाप्रकारे आपण पाहतो कि ख्रिस्ताचा संदेश सर्वांनाच पचणार नाही ह्याची शाश्वती ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानात देत आहे.
बोधकथा:
ग्रीस ह्या देशात दि ओश्कोरोस नावाचा एक श्रीमंत मनुष्य होता. त्याला बार्बरा नावाची एक अतिसुंदर मुलगी होती. तिची सौदंर्य तिच्या असुरक्षितेचे कारण बनू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिला नजर कैदेत बंद केले. तिला अनेक राजकुमारांचे वर आले पण त्या सर्वांना तिने नाकार दिला. कारण तिने ख्रिस्ताला आपला वर मानले होते म्हणून एक दिवस तिचा वडील दूर देशात असताना तिने गुप्तपणे बाप्तिस्मा घेतला. ह्या बाप्तीस्म्या द्वारे तिला कृपेचे दान प्राप्त झाले ज्याद्वारे तिने आपल्या घरातील ख्रीस्तेतर सर्व मुर्त्या फोडून काढल्या.
जेव्हा बार्बराचे वडील दूर देशातून परत आले तेव्हा त्याने पाहिले कि त्याच्या घरातील सर्व दैवी मुर्त्या अस्ताव्यस्त फुटून पडल्या होत्या हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोहचली व ह्यांचे कारण त्याने बार्बराला विचारले त्यावर बार्बरा म्हणाली कि तिने ख्रिस्त स्वीकारला आहे म्हणून मुर्तीपुजा करणे हे तिच्या मनाविरुद्ध होते. आपल्या मुलीने केलेल्या कृत्याबद्ल चीडचिडा होऊन त्याने बार्बराला तुरुंगात टाकले जिथे तिला असंख्य शारीरिक यातना सहन कराव्या लागल्या पण ह्या यातनांचे सांत्वन ख्रिस्ताने तिला दर्शन देऊन केले. अखेरीस तिच्या वडिलांनी तिला मरण दंड ठोठावला. मरणानंतर ज्या ठिकाणी तिला पुरण्यात आले त्या गावात अनेक चमत्कार घडून आले.
मनन चिंतन:
          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या भाविकांनो आजचे शुभवर्तमान एकूण आपल्याला धक्का बसतो. पायाखालची जमीनच हलल्या सारखे वाटते. आजपर्यंत आपल्याला ख्रिस्ताविषयी असलेल्या समजूतीला तडा जातो.  कारण येशू स्वतः म्हणतो की, “मी ह्या जगात आग लावण्यासाठी आलो आहे.”  तसेच तो पुढे म्हणतो की, “मी ह्याजगात शांती पसरविण्यासाठी नव्हे तर फुट पाडण्यासाठी आलो आहे.” हे विधान त्याच्या शिकवणुकीशी जुळत नाही. कारण येशूच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत पाहिले की येशू शांतीचा संदेश पसरविण्यासाठी होता. येशुच्या जन्माच्यावेळी गाब्रीयाल दूताने शांतीचा राजा जन्मास येणार आहे हा संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचविला. व्यभिचारी स्त्रीला मोशेच्या नियमशास्र्ताप्रमाणे दगडमार करण्याऐवजी क्षमा केली. ख्रूसावरून स्वतःच्या मारेकार्यांना क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली. अशाप्रकारे आपण पाहतो की येशूचे शांती पसरविण्यास प्राधान्य दिले. पण आजच्या शुभवर्तमानात ‘शांतीचा राजा’ हे शिर्षक त्याच्यापासून हिरावून घेतल्यासारखे चित्र आपल्या डोळ्या समोर येते पण वास्तविक रुपात हे सत्य नाही. कारण येशूच्या शब्दाने तो देवराज्याची  घोषणा करण्यासाठी आला आहे. हा संदेश दडलेला आहे. म्हणून जरी येशूच्या शब्दांनी अशांतीचा वेश परिधान केला तरी त्या वेशामागे शांतीचा संदेश आहे.
          म्हणून येशू आगलावण्यासाठी आला हे सत्य आहे पण ती आग म्हणजे देवराज्याची. जुन्या करारात मोशेला परमेश्वराने अग्नीने पेटलेल्या झुडूपात दर्शन दिले. यहेज्केलच्या पहिल्या अध्यायात पवित्र आत्मा अग्नीच्या रुपाने प्रेषितांवर उतरला व त्यांना ध्येर्याने भरले अशाप्रकारे बायबल मध्ये अग्नी परमेश्वराचे अस्तित्व प्रकट करतो म्हणून हा अग्नी नाश करणारा नव्हे तर देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा व उत्साह देणारा आहे.
          पुढे येशू म्हणतो की तो शांती पासरविण्यासाठी नव्हे तर फुट पाडण्यासाठी आला आहे. देवाराज्याचा संदेश पचवणे सर्वाना शक्य नाही. कारण हा संदेश ऐकूण  काहीजण येशुजवळ येतील, तो आचरणात आणतील पण काहीजणांना तो कडू वाटेल म्हणून त्याचा स्विकार करणे किंवा आचरणात आणणे त्यांच्या इच्छेविरुद्ध जाईल. जगात अशाप्रकारे फुट पडेल, ती म्हणजे “ख्रिस्तासाठी व ख्रिस्ताविरद्ध”  असलेल्या लोकांमध्ये - सासू विरुद्ध सून, मुला विरुद्ध बाप.  हि फुट जुनी पिढी नवीन पिढी म्हणजेच जुना करार विरुद्ध नवीन करार येशूच्या येण्याने आपले पवित्र शास्त्र दोन भागात विभागले आहे. नवा करार जुन्याकरारास पूर्णत्वांस नेतो. म्हणून देवराज्य जरी जुन्या करारापासून प्रकट केले जात असले तरी नव्या करारात देवराज्याच्या प्रेमाचा संदेश अधिक उघडपणे नमूद केलेला आहे. जुन्या करारात याहावे हा फक्त इस्त्राएलचा देव म्हणून ओळखला जातो. पाप्यांना शिक्षा, मूर्ती पुजकावर परमेश्वरचा राग ह्या गोष्टी ठळकपणे नमूद केल्या आहेत.  
          पण नव्या करारात देवाच्या प्रेमाला अधिक प्राधान्य दिले आहे. परमेश्वर हा प्रेमळ आहे, तो इस्त्राएलचाच नव्हे तर सर्वांचा देव आहे. आपण सर्व त्याची मुले आहोत आणि जरी पण आपण त्याच्यापासून दूर गेलो तरी तो आपल्याला जवळ घेण्यास आतुर आहे. पण तोच प्रेमाचा संदेश आजच्या जगात सर्वाना मान्य नाही. ख्रिस्तसभा ‘शेजाऱ्यावरील प्रिती’ हे सर्व अडचणीचे औषध आहे हे घसा फोडून प्रकट करते पण जगाला ‘प्रितीने’ अडचणी दूर करणे हा मार्ग व्यवहार शून्य वाटतो.
          हाच संदेश दुसऱ्यापर्यंत पोहचण्यास आजच्या जगातच नव्हे तर ख्रिस्तालासुद्धा त्याच्या काळात कठीण झाले त्यासाठी त्याला विरोध झाला, त्याला दुःख सहन करावे त्यासाठी त्याला विरोध झाला, त्याला दुःख सहन करावे लागले. म्हणून येशू म्हणतो की मला बाप्तिस्मा घ्यायला हवा व तो घेईपर्यंत माझी किती तळमळ होणार. इथे बाप्तिस्मा म्हणजे त्याच्या वाटेत येणारे काटे व यातना. हे चित्र आपल्या जीवनात पुनरावृत्तीत होणे अटळ आहे. ख्रिस्ताचा संदेश दुसऱ्यापर्यंत पोहचविताना त्रास सहन करावा लागेल, सहाजिकच आहे. आजच्या पहिल्या वाचनात पाहतो की यिर्मयाला सुद्धा देवाचा शब्द प्रकट करण्यावरून कोरड्या विहिरीत टाकण्यात आले. त्याप्रमाणे आपणसुद्धा ख्रिस्ताबरोबर रहायचं असेल त्याच्याबरोबर कालवरीपर्यंत जाणे अगत्याचे आहे. त्याच्यासारखा क्रूस वाहने जरुरीचे आहे कारण कालवरी नंतरच पुनरुत्थानाची पहाट आहे.
          आपले दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्तासाठी व ख्रिस्ताविरोधी लोकांच्या संपर्कात येणे निःसंदिग्ध आहे अशा वेळी आपण ख्रिस्त निवडावा व शेवटपर्यत त्याच्याबरोबर राहून त्याचे प्रेम इतरांना द्यावे म्हणून त्यासाठी लागणारी कृपा व शक्ती मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया. 
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘ हे प्रभू आमची प्रार्थना ऐक’.
१.    ख्रिस्त प्रेमाचा संदेश जगाला देण्यास झटणारे आपले पोप फ्रान्सीस कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनींवर परमेश्वराचा वरदहस्त असावा व ह्या प्रेमाचा अनुभव अधिकाधिक लोकांना यावा म्हणून लागणारी कृपा शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आज संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी अशांतता पसरली आहे ह्या अशांततेचे कारण समजून घेऊन त्याजागी शांती प्रस्तापित करण्यास राजकीय व धर्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.    नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोकांची घरे व निवारा उद्वस्थ झालेली आहेत ह्या सर्व लोकांना परमेश्वराचा आश्रय मिळावा व त्यांचे निवास पुन्हा उभे करण्यास अनेक मदतीचे हाथ पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. ज्यांना शिक्षांना पासून वंचित रहावे लागत आहे अशा सर्वांना चांगले शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांनी समाजातील वाईट गोष्टींचा समूळ नाश करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.    आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडूया.