प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील २६ वा रविवार साजरा करीत आहोत. जिथे न्याय, प्रीती, निती व
बंधुप्रेम आहे तिथे परमेश्वराची शांती नादेल असा संदेश आपल्याला आज ख्रिस्त सभा देत
आहे. आजच्या पहिल्या वाचनात आमोस हा संदेष्टा त्याने विलासी लोकांचा अधिकार केला
आहे. विलासी म्हणतात उद्याचं मरण आहे तर आज जीवनाचा उपभोग का घेऊ नये? सर्वसामान्य माणसे थोर लोकांशी तुलना करून आपल्या मोज मजेचे
समर्पण करू पाहत होते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपला शिष्य नियमित शोध करीत
आहे की आपण प्रभू येशू पुन्हा येईपर्यंत निष्कलंक व निर्दोष राहावे. आजच्या शुभवर्तमानात
आपणास श्रीमंत मनुष्य व दारिद्र्य लाजरस याचा दाखला ऐकावयास मिळतो.
माणसाला विनाशाकडे
नेण्याची क्षमता धनात आहे. म्हणून आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला देवाने
ज्या काही देणग्या दिल्या आहेत त्या सर्व देणग्याचा योग्य वापर सुवार्ता पसरविण्यासाठी
केला पाहिजे. आपण या हा महाबलीदानामध्ये भाग घेत असताना प्रभू येशूची कृपा आणि
आशीर्वाद मागूया.
बोधकथा:
एकेकाळी एक राजा होता. त्याच्याकडे अपाट संपत्ती होती.
परंतु त्याची प्रजा गरीब होती. तो त्याच्या संपत्तीला खूप प्रेम करत असे. तो त्याची
संपत्ती कोणालाही देत नसे. एका दिवशी त्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते. ती
युक्ती म्हणजे माझ्याजवळ सोने, चांदी आणि हिरे हे धन माझ्याजवळ प्रचंड प्रमाणात
आहे. या मौलवान धनाला मला कुठेतरी ठेवायचे आहे. तर मग राजा जागा शोधायला लागतो.
जागा शोधताना त्याला एक गुहा दिसते आणि त्या गुहेमध्ये शिरतो. त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर त्याला
एक खोली दिसते त्या खोलीला एक दरवाजा असतो. मग राजा विचार करतो की माझे धन मी या
खोलीमध्ये ठेवायला पाहिजे. जर मी माझे धन या खोलीमध्ये ठेवले की कोणालाही त्याचा
पत्ता लागणार नाही. एका रात्री तो त्याच्या जिवलग नोकराला बोलावतो आणि सर्व धन
राजा आणि नोकर त्या गुह्याच्या खोलीमध्ये नेघून ठेवतात. या धनाविषयी राजाला आणि त्याच्या
जिवलग नोकराला माहीत असते. दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. राजा आपल्या नोकराला खोलीच्या
चाव्या देतो आणि खोलीची देखभाल करायला सांगतो. नोकर त्या खोलीची दररोज पाहणी करतो.
एका दिवशी राजा त्याचे धन बघण्यासाठी गुहेच्या खोलीत शिरतो तो बघतो की खोलीचा
दरवाजा नोकराने उघडा ठेवला आहे. माझे सर्व धन व्यवस्थित असणार की नाही अशी प्रचंड भीती त्याच्या मनात
खळबलते. तो काही क्षणातच खोलीमध्ये जाऊन धनाची देखणी करतो. परंतु त्याच्या
पाठीमागे राजाचा नोकर येतो आणि दरवाजाला कुलूप लावून बंद करतो. राजा खोलीतच राहतो.
तो आरडा ओरड करतो पण कोणीही दरवाजा उघडत नाही. तो त्या खोलीमध्ये जेवण शोधतो पण
त्याला काही भेटत नाही. तेथे सोने-चांदी आणि हिरे असतात पण तो ते खाऊ शकत नाही आणि
तो त्या खोलीमधे मरून जातो
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्याला जर अंतकाळाचा प्रवास
चालू ठेवायचा असेल तर आपणाला दुसऱ्यांची सेवा करायला किंवा मदत करायला हवी आहे.
आपल्याला धन थोड्यावेळे पर्यंत आनंद देऊ शकते परंतु सर्वकालिक आनंद आपण आपल्या गुणावरून
प्राप्त करू शकतो.
मनन
चिंतन
इतिहासामध्ये खूप काही
राज्यांनी राज्य स्थापन केली. परंतु राज्यामध्ये फक्त मानाचे स्थान धनवानाना
मिळाले होते. ते आपले जीवन एशोआरामात जगत होते. त्यांना कुठल्याही वस्तूची कमी
नव्हती. त्यांना धार्मिक स्थळावर प्रथम स्थान होते. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त या
भूतलावर आला तेव्हा त्याने देवराज्याचे दरवाजे गरिबांसाठी उघडले. तो गरिबा सारख्या
या जगामध्ये आला. आणि त्यांनी गरिबा सारखा जन्म घेतला. तो गरिबांमध्ये राहिला.
प्रभू येशू ख्रिस्ताला दारिद्र्य विषयी एकदम जवळून अनुभव होता.
आजच्या शुभवर्तमानात आपण
ऐकतो की दारिद्र्य लाजरस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामाच्या उराशी नेवून
ठेवले. श्रीमंत ही मेला व तो अधोलोकांत यातना भोगत राहिला. श्रीमंत व्यक्तीने लाजरससाठी
काहीही चांगले कृत्य केले नाही तसेच काही वाईटही केले नाही तरीही त्याला नरकात
जावे लागले. खरे तर श्रीमंत माणसाने काहीही केले नाही म्हणून त्याची अशी अवस्था
झाली. समाजातील अन्याय भ्रष्टाचार मिळवणूक गरिबांची दूरदर्शन याविषयी काहीही न
करणे सुद्धा पाप आहे अशी शिकवणूक संत लोक देत आहे.
आजच्या घडामोडी च्या
जीवनामध्ये माणूस हा स्वार्थी झाला आहे. तो केवळ आपल्या स्वतःचा विचार करत आहे. तो
आपले डोळे चादरीने झाकून तो श्रीमंती तीकडे धावून जातो. या श्रीमंतीकडे किंवा
पैशाकडे धावत असताना त्याला देव कोण आहे किंवा या जगामध्ये त्याची येण्याचे कारण
काय आहे त्याला ठाऊक नाही. आजच्या शुभवर्तमानात श्रीमंत माणूस देखील त्याचे सुखी
आणि आनंददायी जीवन जगत होता. परंतु त्यांनी कधीही विचार केला नाही की मेल्यानंतर
त्याचे जीवन कोणत्या जीवनामध्ये दुभागले जाईल. गरीब लाजरस हा खूप गरीब होता पण
त्याला जे काही खावयास मिळायचे तो खाऊन तृप्त होऊन देवळात धन्यवाद देत असे. आपले
या भूतलावर जीवन दीर्घकालासाठी आहे. परंतु अंतकाळाचा प्रवास आपला मेल्यानंतर चालू
होतो. जसे सोन्याला चमकदार करण्यासाठी अग्नी मधून जायला लागते तसेच माणसाला देखील
या जगाच्या परीक्षेतून पार पडायला लागते.
या जगामध्ये जीवन जगणे
सोपे नाही. कितीतरी अडीअडचणीला सामोरे जावे लागते. आज प्रभू येशू
यादृष्टांताद्वारे आपल्याला गरीबावर प्रेम दया क्षमा आणि मदत करावयाला आव्हान करत
आहे. आज आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारू या. माझ्या आजूबाजूला अनेक गोरगरीब आहेत
काहींना उपाशी पोटी राहावे लागते, बरेच
काबाड कष्ट करावे लागतात. मला त्याची दया येते पण मी माझ्या परीने त्यांना मदत
करण्याचा प्रयत्न करतो का? त्याचप्रमाणे
आपण आपले जीवन आयुष्य आरामात घालवताना आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या कष्टाची आपण
जाणीव ठेवली पाहिजे.त्यांनी बऱ्याच हाल अपेक्षा सहन करून ख्रिस्ती विश्वास जिवंत
ठेवला. मात्र आपण ह्या विलासी जगात राहून ही श्रद्धा टिकवून ठेवण्याऐवजी नष्ट करीत
आहोत का? त्या श्रीमंत
माणसाप्रमाणे जगात राहून विलासी जीवन जगायचे व शेवटी मरणानंतर क्लेश भोगायचे की देवावर श्रद्धा ठेवून जीवन जगायचे व शेवटी स्वर्गात जायचे? ह्यावर चिंतन करूया
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे प्रभू, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’
१. आपले परमगुरु, महागुरू, सर्व धर्मगुरू व
व्रतस्थ यांच्यात, ऐकीची भावना निर्माण होऊन, ती इतरांना देता यावी व इतरांना त्याप्रमाणे मार्गदर्शन
करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय
नेत्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून, त्यांचे जीवन
लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना.
३. "त्यांनी
सर्वांनी एक व्हावे" अशी ही प्रभू येशूची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी व
आपल्यामधील असलेला भेदभाव नष्ट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे कोणी
देवापासून दुरावलेले आहेत, त्यांनी मागे वळून परत येशूला आपला राजा म्हणुन स्विकारावे
व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण
ख्रिस्ताला स्विकारावे व त्याच्या मुंल्यावर आपले जीवन जगून, तोच ख्रिस्त
इतरांच्या जीवनात आणण्याचा सदैव प्रयत्न करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment