Tuesday 25 February 2014

Reflections for the Homily By: Manuel Fernandes.







सामान्य काळातील आठवा रविवार

दिनांक : ०२/०३/२०१४
पहिले वाचन  यशया ४९:१४-१५
दुसरे वाचन: १करिंथ :-
शुभवर्तमान: मत्तय :२४-३४











''देवावर विश्वास ठेवा धनाची सेवा करू नका.''
प्रस्तावना:

प्रिय भाविकांनो आज ख्रिस्तसभा सामान्यकाळातील आठवा रविवार साजरा करत आहे. आजच्या उपासनेचा विषय आहे, ''देवावर विश्वास ठेवा धनाची सेवा करू नका.''
पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला देवाचे प्रेम हे एका धरतीवरच्या आईच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे ह्याची शाश्वती देत आहे. स्वर्गराज्याचा कारभारी आपल्या सेवेत विश्वासू असावा असे संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्राद्वारे सांगत आहे. तर मत्तयच्या शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त आपणास सांगतो की, तुम्ही उद्याची चिंता करू नका कारण देवाला आपली चिंता आहे आणि त्यामुळे तो आपल्या सर्व गरजांची पूर्तता करतो.
आजच्या उपसानेद्वारे परमेश्वर आपणास त्याच्यावरील आपला विश्वास दृढ करण्यास आमंत्रित करीत आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्तसभा आज बायबल रविवार साजरा करीत असताना आपण आपल्या जीवनातील सर्व चिंता सोडून देवाच्या शब्दास योग्य ते स्थान दयावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.  

पहिले वाचन (यशया; ४९:१४-१५):

यशया संदेष्टा हा महान असा प्रवक्ता होऊन गेला. जेव्हा इस्त्राएली जनता म्हणत होती की देव आम्हाला विसरला आहे व त्याने आम्हाला एकटे सोडले आहे तेव्हा यशया संदेष्टा म्हणतो, 'देव तुमच्यावर खूप प्रेम करतो, त्याला तुमची चिंता आहे आणि तो तुम्हाला कधीच विसरणार नाही.' एक स्त्री आपल्या तान्हया बाळाला विसरेल का? जरी ती विसरली तरीसुद्धा मी मात्र तुम्हाला विसरणार नाही. इकडे आपल्याला दोन उपमा आढळतात; एक म्हणजे, आईची उपमा देवाला व बाळाची उपमा इस्त्राएल जनतेला दिली आहे. यशया संदेष्टा आईच्या प्रेमाची व देवाच्या प्रेमाची तुलना करत असताना म्हणत आहे, हे इस्त्राएल जनते देवाचे प्रेम अपार आहे, देव खूप दयाळू आहे, प्रेमाळू व विश्वासू आहे. तो आपल्याला सोडेल हे मनात सुद्धा येऊ देऊ नका, त्याऐवजी त्याच्यावर विश्वास ठेवा. जेव्हा अंधाराचे दिवस आपल्या जीवनात येतील तेव्हा देव आपल्याबरोबर नक्कीच असेल आणि तो आपल्याला एकटे सोडणार नाही.

दुसरे वाचन (१करिंथकरांस पत्र; :-):

करिंथकरांस पहिले पत्र हा नव्या करारातील सर्वात दीर्घ पाळकीय लेख आहे, पाळकीय सेवेत येणा-या कठीण समस्या कशा हाताळाव्या त्याचे बहुमोलाचे सूचक मार्गदर्शन येथे दिले आहे. अध्याय ४:१-५ मध्ये सेवा कार्य व विश्वासाविषयी माहिती दिली आहे. येथे संत पौलने दोन अतिशय उचित व यथार्थ संज्ञा योजल्या आहेत. सेवक शब्दश: चाकर-नोकर आणि जबाबदारी सोपवणे म्हणजे कारभारी पहिल्या संज्ञेमध्ये ख्रिस्ताला व्यक्तिश: जबाबदार भाव्य व्यक्त होतो, कारण ही व्यक्ती त्याच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे जे देवाचे वचन शिकवितात ते देवाच्या रहस्याचे म्हणजे ख्रिस्ताविषयीच्या शिक्षणाचे कारभारी आहोत त्यामुळे त्यानी आपल्या सेवेत विश्वासू राहिले पाहिजे, कारण प्रत्येकाचा न्याय प्रभू स्वत: करणार आहे. तो सर्व काही उघड करील. आपण ख्रिस्ताविषयी किती खरे शिक्षण दिले याची परिक्षा होणार आहे. जे सेवेत विश्वासू राहतील त्यांनाच देवापासून शाब्बासकी मिळेल ह्यास्तव आपण दुस-याचा न्याय करू नये. देव हा उत्तम न्यायधीश आहे तो त्याच्यापरिने प्रत्येकाचा न्याय करील. ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे देवापासून प्रशस्तिपत्र मिळेल. माझे मन स्वच्छ आहे व माझे दोष मला दिसत नाहीत म्हणून मी निदोष सूटेन असे नाही तर देवाला सर्व काही माहित आहे, म्हणून आपण आपला विश्वास भक्कम करून देवावर प्रेम करावे व त्याचे खरे प्रेषित व्हावे हाच संदेश पौल इथे आपणा सर्वांना करून देत आहे.

शुभवर्तमान (मत्तय; :२४-३४):

आजच्या शुभवर्तमानाद्वारे मत्तयचा देवावर पूर्ण अंतकरणाने मनोभावे असलेला विश्वास सिद्ध होतो. ह्या वचनाची पूर्तता करत असताना तो म्हणतो: "तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही" (मत्तय ६:२४). मत्तयने 'धन' हा शब्द ऐहिक संपत्ती, धन-पैसा, मालमत्ता या सर्वसाधारण अर्थाने वापरला आहे. पुढे मत्तय अध्याय ६:२५-३३ ह्या वचनाद्वारे मनुष्याची जागतिक चिंता व देवाची दैविक भिस्त आपणासमोर सादर करतो. ही वचने साधी असली तरी मनाला भावणारी आहेत. ह्या वचनावरुन मत्तय आपणासमोर एक सत्य प्रखरतेने प्रदर्शित करतो, ते म्हणजे: देव सर्व जीवांची भरपूर काळजी घेतो, तो एकालाही वगळत नाही. हेच सत्य, पक्षी व फूले ह्यांच्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे. (मत्तय ६:२६-२८). 
(मत्तय ६:३१-३३) ह्या वचनावरुन मत्तय आपणापुढे दोन उद्दिष्टे सादर करतो. १. देव आपला स्वर्गीय पिता आहे (मत्तय ६:३२). २. देवाच्या राज्याला व त्याच्या नितिमत्त्वाला अग्रक्रम देणे(मत्तय ६:३३). देवाच्या राज्याला अग्रक्रम देणे म्हणजे राजा ह्या नात्याने आपण त्याच्याशी सर्वप्रथम एकनिष्ठ असणे. या निर्णयातून परिणामी पुढे येणारा जीवनाचा मार्ग म्हणजे त्याचे नितिमत्व. या समंजसपणाच्या ख-या तात्विक बोलातून निराशेचा सूर उमटला असला आणि पूर्वीच्या वचनातून आवश्यक त्या तरतुदीचे अभिवचन दिले तरी चिंता, दु:ख यापासून मुक्ती दिलेली नाही हाच इशारा येथे आहे (मत्तय ६:३४).

बोध कथा:

१. एकदा एक लहान मुलगा व त्याची आई रस्त्यावरून चालत होती. थोड्यावेळाने हायवे येतो. ते रस्ता ओलांडत असताना आई म्हणते, "बाळा माझा हात धर," तेव्हा मुलगा म्हणाला, "नाही आई तू माझा हात धर." आई हसत म्हणाली, "बाळा मी तुझा हात पकडला की तू माझा हात पकडला हे सारखेच आहे ना?" तेव्हा मुलाने म्हटले, "नाही आई जर मी तुझा हात पकडला तर मी रस्त्यावर चालत असताना तुझा हात सोडेन किंवा इकडे-तिकडे धावेन आणि त्यामुळे माझा अपघात होऊ शकतो किंवा काहीतरी वाईट होऊ शकते. परंतू जर का तू माझा हात पकडलास तर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की, कोणत्याही तू माझा हात सोडणार नाही." जेव्हा हे शब्द आईने आपल्या मुलाकडून ऐकले तेव्हा तिला खूप आनंद झाला.(असाच विश्वास आपण देवावर ठेवावा असे येशू ख्रिस्त आपल्याला मत्तयच्या शुभवर्तमानात सांगत आहे.)

2. एकदा फुलामधील नव्या प्रकारचा शोध घेण्यासाठी वैज्ञनिक व वनस्पतीशास्त्रज्ञ पर्वतावरील प्रदेशात चाचणी करीत होते. एके दिवशी त्यांना लांब पल्ल्याच्या दुर्बिणीतून एक दुर्मिळ तसेच अत्यंत सुंदर असे फूल जे वैज्ञानिक दृष्टीकोनातून फार मौल्यवान होते असे फूल दृष्टीक्षेपात आले पण ते अरुंद व खोल दरीत होते. हे फूल मिळविण्यासाठी कोणीतरी खोल दरीत दोरीद्वारे कड्यावरून खाली जाणे प्राप्त होते.
एक तरुण चौकस नजरेने जवळून हे दृश्य बघत होता. वैज्ञानिक त्याला म्हणाले,"जर तू दोरीद्वारे कड्यावरून खाली जाऊन ते फूल आणले तर आम्ही तूला मोठी रक्कम देऊ." आपली दृष्टी कड्यावरून टाकून गोंधळलेल्या स्वरात युवक उत्तरला, "थांबा, मी दहा मिनिटात येतो." काही वेळाने तो एका वृध्द माणसासह परतला. वनस्पतीशास्त्रज्ञाजवळ जाऊन युवक म्हणाला,"मी तुमच्यासाठी जेव्हा फूल आणण्यास ह्या कड्यावरून खाली जाईन, तेव्हा ह्या व्यक्तीने हा दोर धरून ठेवावयास हवा, कारण तो माझा पिता आहे आणि माझ्या पित्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
 
मनन चिंतन:

.    मनुष्य जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो त्याच्याबरोबर जणुकाही विविध गरजेने भरलेले गाठोडे घेऊन येतो. त्याची एक गरज संपली की लागलीच दुसरी गरज त्या गाठोड्यामधून त्याच्यासमोर उभी राहते. अश्या हया चक्रव्युहास प्रत्येक मनुष्याला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सामोरे जावे लागते.
आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशूख्रिस्त आपणा सर्वांस एक आशादायी आणि तारणदायी अभिवचन बहाल करत आहे: 'तुम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे'(मत्तय::३१-३२). आपण आपले दैनदिन जीवन जगत असताना येशूख्रिस्ताच्या ह्या आशादायी अभिवचनावर संपुर्ण मनाने ह्द्याने विश्वास ठेवला पाहिजे. "विश्वास" हा आपल्या जीवनातील अति महत्वाचा घटक आहे, जो आपले देवाबरोबरचे नातेसबंध घनिष्ठ करतो. "ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे ते निश्चल सर्वकाळ टिकणा-या सीयोन डोंगरासारखे आहेत"(स्तोत्रसंहिता-१२५:). ज्या निर्माणकर्त्या देवाने आपणास जीवन दिले त्या देवास आपणा सर्वांची काळजी आहे. ज्याप्रमाणे आपला स्वर्गीय पिता आकाशातील पाखरांची, रानांतील फुलांची रानांतील गवताची काळजी वाहतो त्यापेक्षा कितीतरी पटीने तो आपणा सर्वांची काळजी वाहतो, कारण तो आपणा सर्वांस ह्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो(मत्तय::२६), आपणास तो सांगतो, 'कदाचित स्त्रीला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पाहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे (यशया ४९:१५-१६).
आजच्या उपासनेद्वारे येशूख्रिस्त आपणास सांगतो की, तुम्ही तुमच्या भौतिक गरजांची चिंता करू नका, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य त्याचे नितिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणूनच आज ख्रिस्तसभा बायबल रविवार साजरा करीत असताना आपणास देवाच्या वचनांना देवाच्या आज्ञाना आपल्या जीवनात प्राधान्य देऊन पवित्र, सेवाभावी परोपकारी जीवन जगण्यासाठी आवाहन करत आहे.

.   आजच्या आधुनिक युगात आपण पाहतो की, बरेचसे लोक धनसंपत्ती मिळविण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करत असतात. मानवास दैनंदिन जीवन जगण्यासाठी धनसंपत्तीची आवश्यकता असली तरी तिला आपल्या जीवनात गरजेपेक्षा अतिमह्त्वाचे स्थान देणे हे रास्त नाही, कारण येशूख्रिस्त आपणास  सागंतो, "कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील दुस-यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल दुस-याला  तुच्छ मानील, तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही"(मत्तय::२४). धनसंपत्तीद्वारे आपण जागतिक सु: मिळवू शकतो परंतू आध्यात्मिक सु:-शांती आपण मिळवू शकत नाही, उदा.; धनसंपत्तीने आपण औषध विकत घेऊ शकतो परंतू चांगले आरोग्य मात्र मिळवू शकत नाही. धनसंपत्तीने आपण उच्च दर्जाचे कपडे घेऊ शकतो परंतू चांगले शरीर घेऊ शकत नाही. धनसंपत्तीने आपण चांगले घर, बंगला घेऊ शकतो परंतू त्यामधली नाती, जिव्हाळा प्रेम घेऊ शकत नाही.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमच्या प्रार्थना ऐकून घे.
. आपले पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू धर्मभगिनी ह्यांनी देवाचा संदेश जगाच्या कानाकोप-यात पोहचवावा, त्यांच्या कार्यात त्यांना मदत मिळावी सर्व संकटापासून त्यांचे रक्षण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आज आपण बायबल रविवार साजरा करीत असताना, आपल्याला प्रभूच्या शब्दांचे महत्व कळावे व हेच शब्द आपण आपल्या जीवनात आत्मसात करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
. जे लोक देवावर विश्वास ठेवत नाही, त्यांना देवाने स्पर्श करावा त्यांचा विश्वास बळकट करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत त्यांना परमेश्वराने चांगले आरोग्य दयावे जे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला देवाने शांती दयावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

. आपल्या स्वत:च्या वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.

4 comments: