Saturday 30 March 2019

Reflection for the Homily of 4th SUNDAY OF LENT (31-03-19) By Br. Lipton Patil  







उपवास काळातील चौथा रविवार

पहिले वाचन: यहोशवा ५:९अ-१२
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२१
शुभवर्तमान: लूक १५:१-३, ११-३२
दिनांक:३१/०३/२०१९ 





विषय: अंधारातून प्रकाशाकडे, सैतानाकडून ख्रिस्ताकडे व ख्रिस्तामध्ये...

प्रस्तावना:
आज आपण प्रायश्चित काळातील चौथ्या रविवारात पदार्पण करीत आहोत. आपण देवाच्या क्षमेचा, दयेचा व अस्सिम प्रेमाचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला निमंत्रण देत आहे.
यहोशवाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणाला कळून येते की, इस्रायली लोकांनी जुनी जीवनपद्धती सोडून नवीन जीवनाला प्रारंभ केला. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात सांगतो की, परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आपला स्वतःबरोबर समेट केला. जर कोणी ख्रिस्ता ठायी असेल, तर तो नवीन उत्पत्ती आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात उधळ्या पुत्राच्या दाखल्याबद्दल आपण ऐकणार आहोत. आपण सुध्दा आपले जीवन उधळ्या पुत्राप्रमाणे जगून देवाच्या प्रेमापासून दूर गेलो आहोत, परंतु आज देवाच्या प्रेमाचा स्वीकार करण्याची ती वेळ आली आहे. उधळ्यापुत्राप्रमाणे जेव्हा आपण पश्चातापी अंतःकराणाने परमेश्वराकडे धाव घेतो, तेव्हा तो दयाळू बाप आपला स्वीकार करण्यास सतत तयार असतो.
म्हणून पश्चातापी अंतःकराणासाठी आजच्या पवित्र मिसा बलिदानात भक्तीने सहभागी होताना प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहोशवा ५:९अ-१२
          इस्रायली लोक जेव्हा इजिप्त देशातून मुक्त होवून एलीस व सिनाय ह्यांच्यातील सीन नावाच्या वाळवंटात आले, तेव्हा त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली. लोक मोशेला म्हणाले की, येथे आम्ही उपाशी मरावे म्हणून तू आम्हाला ह्या वाळवंटात आणले आहेस का? तेव्हा देवाने इस्राएली लोकांना मान्ना दिला. अन्नाचे नाव मान्ना ठेवले, कारण ते तांदळासारखे पांढरे शुभ्र दिसत होते व चवीला मधासारखे होते. काही काळानंतर म्हणजे मोशेच्या मृत्युनंतर यहोशवाने इस्रायली लोकांना कानन देशात आणून व तो प्रदेश ताब्यात घेतला ज्यात दुधामधाच्या नद्या वाहत होत्या. इस्रायली लोकांनी गीलगालात तळ दिल्यावर व्हलांडणाचा सण साजरा केला. व्हलांडण सणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्त्पन्न झालेल्या धान्याची भाकर व हुरडा त्यांनी खाल्ला. त्या दिवसापासून ते देवावर व देवाने पाठविलेल्या अन्नावर अवलंबून राहिले. देवाने दिलेले अन्न इस्रायली लोकांनी खाल्ले व मान्ना बंद झाला व पुन्हा इस्रायली लोकांना मान्ना मिळाला नाही. मग तद्नंतर, इस्रायली लोक वतनभूमीत आले व तेथे त्यांनी नवीन जीवन जगण्यास सुरुवात केली, जुने ते सोडून दिले.

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२१
          संत पौल व करिंथकरांतील लोकांमध्ये तणावाचे संबंध झाले होते. काही लोकांनी संत पौलावर हल्ला करून, तो खोटा प्रेषित असल्याचा दावा केला होता. संत पौलवर खूप अन्याय झाला होता, परंतु अशा परिस्थितीत तो लोकांना जवळ बोलवून घेतो असे ह्या पत्रात दिसून येते. तो लोकांना श्रध्देचे जीवन जगण्यास आमंत्रण करतो व म्हणतो, आपली देवाशी मैत्री ही ख्रिस्तामुळे झाली आहे. परमेश्वराने ख्रिस्ताबरोबर समेट केला आहे. तो नवी निर्मिती आहे. आपल्या पापांसाठी देवाने त्याला पापी असे गणले. प्रभू मध्ये नीतिमान जीवन जगून ख्रिस्ताच्या एकीत राहावे अशे संत पौल नव्याने ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यास सुरुवात करायला सांगत आहे. जुने ते गेले, आता नव्याची सुरुवात झाली आहे.

शुभवर्तमान: लूक १५:१-३, ११-३२
          प्रभू येशूच्या काळात जकातदार, शास्त्री व परुशी हे भ्रष्टाचाराचे जीवन जगत होते. स्वतःला पवित्र व महान समजत व दुसऱ्यांकडून मान व सन्मानांची अपेक्षा करीत असत. जकातदार, शास्त्री व परुशी ख्रिस्ताबद्दल नेहमी कुरकुर करत असत की, ख्रिस्त पापी लोकांचा मित्र व साथीदार आहे. त्यांच्याबरोबर जेवायला बसतो व सामील होतो. असे काही बोलत असताना येशू त्यांना काही दाखले देतो: हरवलेले मेंढरू, नाणे व मुलगा जेणेकरून दैवीकरुणेचा अनुभव जकातदार लोकांना येणार. देव दयाळू व ममताळू आहे. जकातदार म्हणत की. चांगले केल्यास आशीर्वाद व वाईट केल्यास शिक्षा भोगावी लागते. परंतु येशू सांगतो की, पश्चाताप करा व देवाकडे वळा, देव अत्यंत मायाळू व कनवाळू आहे. 

बोधकथा:
एका गावात एका जोडप्याला दोन मुली होत्या. ह्या दोन्ही मुली फार गुणी होत्या. त्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहत असत. एके दिवशी छोटी मुलगी तिच्या आई-वडिलांना सांगते की, मी आसिक नावाच्या मुलावर प्रेम करते. मला त्याच्या बरोबर लग्न करायचं आहे. आई-वडीलानी खूप विरोध केला परंतु, छोट्या मुलीने ऐकले नाही. तिने पैसा संपत्ती घेऊन असिक नावाच्या मुलाबरोबर ती पळून गेली. काही दिवसांनतर आसिक तिला खूप त्रास द्यायला लागला. तिची मारहाण करू लागला व जे काही तिने पैसा व संपत्ती आणली होती ती सर्वकाही तिच्याकडून घेऊन तिला एकटी सोडून तो निघून गेला. अशा परिस्थितीत ती एकटीच राहत होती. तिला व्यवस्थित जेवायला जेवण मिळत नव्हते. तिला कुणाचा आधार नव्हता. अशावेळी तिला तिच्या आई-वडिलांची आठवण  येते व केलेल्या चुकीबद्दल तिला पश्चाताप होतो. दुःखी व निराग्रस्त मन घेऊन ती तिच्या आई-वडिलांकडे जाते व क्षमा मागते. त्यावेळी तिचे आई-वडील तिला प्रेमाने आलिंगन घालतात व सर्व काही विसरून तिला पुन्हा घरात किंवा त्यांच्या कुटुंबात प्रवेश देतात.

मनन चिंतन:
अस म्हटल जात की, “लोक नवीन तंत्रज्ञान शोधतात, परंतु देव नवीन हृदयाला शोधतो; लोक चांगल्या पद्धतीच्या शोधात आहेत, तर देव चांगल्या लोकांच्या शोधात आहे.”
पाप व वाईट कृत्ये आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतात. परंतु तोच देव आपल्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावत असतो. माणसावर ईश्वराच्या करुणेचा वर्षाव होऊन जे लोक देव पित्याच्या प्रीतीपासून, करुणेपासून व क्षमेपासून दूर गेले आहेत. अशा लोकांना पुन्हा दैवी करुणेचा, प्रीतीचा व क्षमेचा अनुभव यावा व तो अनुभव उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारेआपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे. या दाख्ल्यातून समजते की, प्रत्येकाला दैवी करुणेच्या स्पर्शाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवन उधळ्या पुत्रासारखे आहे.आपल्या वाईट वागणुकीमुळे, कृत्यामुळे व इतरांबरोबर चांगले संबंध नसल्यामुळे आपण दूर गेलो आहोत. पण जेव्हा आपण हा दाखला वाचतो तेव्हा हा दाखला आपल्या समोर एक आव्हान ठेवत असतो, ते आहे मन परिवर्तन करण्याचे आव्हान. हा दाखला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणतो, सैतानाकडून ख्रिस्ताकडे आणतो, इतकेच नव्हे तर, चांगला पश्चाताप करावयास शिकवतो. खरा पश्चाताप करून आपण देवाकडे व शेजाऱ्याजवळ येतो. ह्या दाखल्यातून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की, ख्रिस्त हा प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे. त्याचे प्रेम व त्याची माया ही अपार आहे.
छोट्या भावाने संपत्ती घेऊन ऐश आरामाचे जीवन तो जगाला व जेव्हा सर्व संपत्ती संपून त्याच्याकडे काहीच राहिले नाही तेव्हा त्याला त्याच्या वडिलांची आठवण आली. म्हणजेच त्याला त्याची चूक समजली. आपण अंधारात जीवन जगात असल्याची त्याला जाणीव झाली. सैतानाच्यासानिध्यात मी वास करीत आहे हे त्याला समजले. अशावेळी तो उठून वडिलांकडे गेला व त्याने केलेल्या चुकी बददल दयेची क्षमेची याचना केली. वडिलांनी त्याच्या अंगात उत्तम झगा घालून, हातात अंगठी  व पायात व्हाणाचे जोड घालून तसेच पुष्ठ वासराची मेजवानी करून आपल्या हरवलेल्या मुलाचा पुन्हा एकदा आपल्या घरात स्वीकार केला.यावरून आपल्याला देवाच्या क्षमाशील व दयाळू स्वभावाची जाणीव होते. या दाखल्यात पित्याच्या प्रेमाविषयी वर्णिले आहे. देवाची माया कधीही उणी पुरात नाही. आपल्या पापांसाठी देवाचा एकुलता पुत्र आम्हा तारावयास क्रुसावर मरण पावला. आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून क्षमेचा धडा गिरवण्यास शिकवला. आपण ह्या जगात ख्रिस्ताचे प्रेम द्यावयास आलो आहोत म्हणूनच आपणामध्ये शास्त्री व परुशी लोकांची वृत्ती आपल्यामध्ये दिसायला नको.
मोठ्या भावाचे व्यक्तिमत्वार आपण थोड मनन चिंतन करूया. त्याचे व्यक्तिमत्त्व हे फार गुंतागुंतीचे आहे. त्याला वाईट वाटते कारण त्याचा भाऊ परत आला आहे. आपण सुध्दा असेच करत असतो. जेव्हा एकाद्याचे चांगले होते ते आपल्याला बघवत नाही. दुसर्यांच्या आनंदात सहभागी होण्यास आपण नकार देत  असतो. येशू पाप्यांच्या बरोबर जेवतो हे शास्त्री- परुशी ह्यांना आवडत नसे. मोठा भाऊ वडिलांच्या बरोबर राहून सुध्दा नंतर रागावतो, कारण त्याने पित्याच्या प्रेमाचा अनुभव घेतला नव्हता एका गुलामा प्रमाणे तो त्याचे जीवन जगत होता. म्हणूनच तो आपल्या धाकट्या भावाला ‘तुमचा मुलगा’ म्हणून संबोधितो. यावरून तो आपल्या कुटुंबा पासून किंवा आपल्या पित्यापासून किती दूर गेला आहे ह्याची जाणीव होते. छोट्या भावाने पश्चाताप करून त्याची चूक काबुल केली व तो आपल्या पित्याकडे परतला. त्याने आपल्या पित्या बरोबर समेट केला. द्या भक्तीवर असलेली साय असते. दयाळू माणूस दयाळू माणूस दुसऱ्यांना आपल्या वेंगेत घेतो.
आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करुया. बापाला म्हणूया, हे पित्या मी तुजकडे धावत येतो माझा स्वीकार कर.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देवा दया कर व आमची प्रार्थना कर.
१) दैवीकरुणेचा संदेश अखिल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी व मिशनरी या सर्वावर ख्रिस्ताचा आशीर्वाद सैदव असावा व आपल्या शब्दाद्वारे व कृती द्वारे ख्रिस्ताच्या दयेचा संदेश इतरांपर्यंत त्यांनी पोहचवावा म्हणून प्रभू चरणी प्रार्थना करूया.

२) आज कितीतरी लोक देवाच्या प्रीतीपासून दूर जाऊन नैराश्याचे जीवन जगात आहेत. अशा लोकांना दैवी करुणेचा स्पर्श होऊन देवाच्या प्रेमाचा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आज जगात संपत्ती, धन- दौलत यांच्यामुळे भांडणे होऊन, वाईट व चांगले यातील फरक विसरून एकमेकाबद्दल मनात सूड घेण्याची भावना निर्माण झाली आहे. अशा ह्या सर्व लोकांवर परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद येऊन, इतरांशी समेट घडवून आणण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या गावात, शेजोळ्यात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत, अशा सर्वांना परमेश्वारचा आरोग्यदायी स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या खाजगी, कौटुंबिक व सामाजिक गरजा परभू समोर मांडूया.               
   
  

No comments:

Post a Comment